आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
इ.स. १६४५ मध्ये रायरेश्वराच्या त्या पवित्र मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अशा या ठिकाणी स्वच्छता व संवर्धन मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वयंसेवकांसाठी मुक्कामाची व्यवस्था, रात्रीचे जेवण, सकाळचा नाष्टा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पारनेर व अहिल्यानगर येथुन येण्यासाठी बस उपलब्ध आहेत. बस दिनांक 24 मे रोजी सायं. 06.00 वाजता निघतील.
संख्या नाही, बदल मोजतोय!